June 5, 2026
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा ब्लॉग महाराष्ट्र मुंबई विदर्भ शेगांव

परिस

ती कामिका एकादशीची संध्या होती. भास्कर उदास भासत होता. जणू त्याला अपराध बोध होत होता की आज मी का उगवलो. ही महाप्रयाणची महायात्रा बघावयास ! लवकर लवकर तो अस्त झाला आणि एकनिष्काम कर्मयोगी ही!
त्याच वेळी , दूर दूर. . . . क्षितिजा पलीकडे. . .कोठे तरी. . . .
आज तिथे सारा आसमंत उजळुन निघाला होता. अवघ्या ४ दिवसानंतर अमावस्या होती, मात्र तिथे आज पूर्णिमा होती जणू.
अचानक . . . तिथे इतका प्रकाश झाला की समोर चे दृश्य दिसेनासे झाले. फक्त एक आवाज आला, “ आलास शिवा ? ये आधी आपण भेटू या ” आणिहळु हळु दोन मानवाकार आकृति एकाकार होताना दिसल्या.
सगळीकडे दीप पाहुन भाऊ म्हणाले, “आज कोणता सणआहे महाराज? ”
महाराज किंचित हसले आणि म्हणाले , “ कर्मयोगी जो परती घरा, तोची आम्हा दिवाळी दसरा! ”


हे ऐकताच भाऊंचे डोळे पाणावले. अश्रुपुरीत नयनांनी त्यांनी महाराजांना प्रश्न विचारले , “ महाराज मला एक विचारायचे आहे. मी माझे कार्य बजावताना कूठे चुकलोतर नाही न? सेवा कार्य करता करता मी कुठे उणा तर पडलो नाही ना ? जाणता अजाणतामी कुणा भक्तालादुखवले तर नाही ना ? ”
महाराज पुनः हसले, “ वेडाच राहिला रे भोळ्या शंकरा,वेडाच !अरे शिवा तुझ्या अविरत सेवेची मी काय प्रशंसा करु. शब्द तोड़के पड़तीलरेमला. ”
भाऊंच्या भावना पुन्हा उचंबळून आल्या. ते कंपित स्वरात म्हणाले, “महाराज, अर्जुनाचा पराक्रम कृष्णविणा आणि मारुतीरायाची कामगिरी रामाविणाव्यर्थच. दोघांच्या मागे कृष्ण आणि रामाचाच हाथ ! महाराज, कर्ता करविता आपणच ! बाकी सर्व फक्त माध्यम. . . .फक्त माध्यम ! ”
महाराज अचानक गंभीर झाले, “ कारेशिवा, तुला तर मी मोक्षच्या सदनासपाठविले होते. तू इथे कसा ? ”
भाऊंनी हल्केच स्मित केलेआणि हळूच पुटपुटले, “क्षमा असावी महाराज, मी तिथुनपळुन आलो.”
“ अरे पण वेड्या का? ”
“ एकदा मी मोक्षचा मोह केला कीकायमचा तिथे मुक्कामी. काय करु
या ऐश्वर्याचे ! जो निर्भेळ आनंद आपल्या सेवेत आहे, आपल्या भू-लोकावरील भक्तांच्या सेवेत आहे,तो स्वर्गलोकी नाही महाराज. मला पुन्हा-पुन्हा, वारंवार भू-तली पाठवा. माझे सेवा व्रत मी पुनः सुरूकरतो. ”


महाराज पुनः हसले, “ वेड्या, लोक मोक्षसाठी जीवनभर माझी साधना करतात, आणि एक तू. . . . . . .”
त्यांनी एक दीर्घ निश्वास टाकला आणि म्हणाले, “ बरोबर आहे, रामा पेक्षा मारुती वरचढ़.म्हणून तर रामा पेक्षा मारुती ची मंदिरे जास्त!आजपर्यंत परिसही फक्त एक कल्पना होती. तू मात्र खरापरिस ! जा तुझी गरज या भूतली नेहमीराहणार आणि तुझ्या मूळे, तुझ्या परिसस्पर्शाने बाकी सगळ्यांचे ही सोने होईल!फक्त थोड़ा वेळ थांब , थोड़ी विश्रांति घे.मला सुध्दा पुनः जायचेचआहे.तो पर्यंत थोड़ासा अल्पआराम!आपण लवकरच निघु! तो पर्यंत आत तर ये.” म्हणत महाराजांनी स्वतः दरवाजा उघड़ला आणि. . . . . .
त्याच क्षणी माझे डोळे ही उघड़ले.
मी माझ्या शयन कक्षात होतो. तेथे मंद मंद सुवास दरवळत होता. समोरच्या घड्याळात सकाळचे ४ वाजले होते.ब्रम्ह-समई पडलेले हे स्वप्न कितीखरे ठरेल हे त्या परमपित्यालाच ठाऊक ! भक्त आणि भगवंत केव्हा,कुठे, कसे पुन्हा येतील हे त्या नियतीलाच माहीत !
एक मात्र खरे,भक्त आणि भगवंताची ही दुर्मिळभेट, माझ्या आठवणींच्या कप्प्यात अग्रस्थानी राहिल आणि एखाद्यादुर्बल क्षणी जर का चित्त- मोहा पोटी, लाभा-पोटी, चित्त जर नीतिमत्ता सोडू लागले तरत्यास ही आठवण लगेच लगाम घालेल, इतके मात्र निश्चित !
जय गजानन
गण गण गणात बोते !

Related posts

आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत तथा साहित्यीक मा.प्रविणजी पहूरकर यांचा सत्कार व व्याख्यान…

nirbhid swarajya

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या 

nirbhid swarajya

जोशी नगरातील छकुली गार्डनमध्ये दोन गट आमने सामने

nirbhid swarajya
error: Content is protected !!