April 18, 2026
जिल्हा बुलडाणा शेगांव शेतकरी

लासुरा परिसरात हरभरा पिक संकटात

शेगांव : मूग, उडीद, सोयाबीन, तुरीचे अस्मानी संकटाने नुकसान केले असताना आता हरभरा पिकावर वातावरणात बदलामुळे रोग पडला आहे. उपाययोजना करूनही उपयोग नसल्याने उत्पन्नात मोठी घट येणार आहे. पीक विम्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळण्याची अपेक्षा आहे. शेगाव तालुक्यातील लासुरा परिसरात गेल्यावर्षीच्या सुरुवातीपासून पिकावर अस्मानी संकटे येत गेली. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे भरपुर प्रमाणात नुकसान झाले. मध्यंतरी कापूस पिकावर शेंदरी बोंड अळी आल्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली. तूर हे पीक साधारण चांगले होते. परंतु व्हायरस आल्यामुळे पिक सोंगणी लवकर करण्यात आले. त्यामुळे उत्पन्नात थोडीफार घट झाली. तसेच हरभरा या पिकावर शेतकर्‍यांची आशा उरलेली होती. परंतु हरभरा पिकावर धुरीमुळे फुल अवस्थेत असताना फुलगळ झाली,त्यामुळे या पिकाची उत्पन्नात घट झाली. सध्या हरभरा पिकावर वातावरणात बदल होत असल्यामुळे रोग आलेला आहे. या परिसरातील बर्‍याच शेतकर्‍यांनी पीक विमा काढलेला आहे. अद्यापपर्यंत पिक विम्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. पिक विमा मिळावा अशी मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 84 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 21 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

व्हाट्सएपच्या माध्यमातून लग्न लावून देण्याचं आमिष इंदोरच्या तरुणाला महागात

nirbhid swarajya

मन नदि पात्रात आढळला इसमाचा मृतदेह हत्या की आत्महत्या गुढ कायम

nirbhid swarajya
error: Content is protected !!