June 5, 2026
चिखली जिल्हा बातम्या राजकीय

लोकजागर पार्टी कडून उंद्रीत विज बिलाची होळी

चिखली : महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांनवर उपासमारीची वेळ आली आहे या लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रातील गोरगरिब मजूर आणि सर्वसामान्य लहान उद्योग करणारे ,हातावर काम नाही असे जवळपास सर्वच कामे ठप्प झाले आहे. त्यामुळे कष्टकरी सर्वसामान्य माणूस संकटात आला आहे. त्यामध्ये घरगुती बील वाढविण्याचा सपाटा महावितरणे लावला आहे, या लॉकडाऊनच्या परिस्थिति मध्ये आज रोजी वीज बिल भरू शकत नाही व तसेच ग्राहकांवर सुद्धा आर्थिक संकट आहे ते सुद्धा वीजबिल भरू शकत नाहीत.

या लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची आर्थिक अडचण खूप वाढली आहे. महावितरणने ग्राहकांच्या विज बिल मध्ये वाढ करून एकप्रकारे ग्राहकांवर अन्याय केला आहे, त्यामुळे ग्राहकांच्या गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष न दिल्यामुळे लोकजागर पार्टी चे युवक प्रदेशाध्यक्ष अंबादास गावंडे यांनी उंद्री गावामध्ये विज बिलाची होळी करून महाराष्ट्र सरकारचा निषेध केला आहे.यावेळी लोकजागर पार्टी चे गजानन गावंडे, विनायक नसवाले,दीपक जगताप, शेख न्यामद शेख यासीन, वसंता बारगळ यांच्यासह आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related posts

अज्ञात वाहनांच्या धडकेत युवक ठार

nirbhid swarajya

लॉयन्स क्लबच्या अध्यक्षा विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 433 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 56 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!