November 20, 2025
जिल्हा

बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस

बुलडाणा : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला आहे.  वानखेड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुुुले अनेक नदीनाल्यांना पूर आला आहे. पावसाचा जोर आता कमी जरी झाला असला तरी अनेक गावांत सध्या पूरस्थिती निर्माण झालीये तर  काही गावांत विजेचा पुरवठा खंडित झाला असून  या पावसामुळे हजारो हेकटरवरील पेरणीचे नुकसान झालं आहे, त्यामुळे नदीकाठच्या सर्वच गावांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सध्याच्या स्थितीत वान नदीवरील पुलावरून पाणी असलायने इथली वाहतूकही विस्कळीत झालीये तसेच बुलडाणा वरवट बकाल येथील अतिवृष्टी मुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांचे  लाखो रुपयांचे धान्य चे नुकसान झाले आहे. संग्रामपूर कृषी
उत्पन्न बाजार समितीचे सभापती घटनास्थळी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सदर नुकसान लाखोंच्या घरात असून कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.

Related posts

विना परवाना शस्त्र व हत्यार बाळगणार्‍या दोघांना अटक

nirbhid swarajya

टीम एक वादळ भारताचं या चळवळीच्या वतीने ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 81 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 05 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!