July 22, 2026
बातम्या

आजपासून बारावीची परिक्षा ; गैरव्यवहार केल्यास होणार थेट गुन्हे दाखल

आजपासून बारावीची परीक्षा १८फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.जिल्ह्यात १०९ परीक्षा केंद्रांवर हीपरीक्षा होत असून, या केंद्रावर सीसी कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.परीक्षेच्या ठिकाणी गैरप्रकारकरणाऱ्यांविरुद्ध आता थेट गुन्हेदाखल करण्यात येणार आहेत. १२ वीपरीक्षेसाठी जिल्ह्यात ३२ हजार २४८परीक्षार्थी आहेत.इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठीशिक्षण विभागाकडून कॉपीमुक्तअभियान राबविण्यात येणार आहे. हेअभियान यशस्वी होण्यासाठी गेल्यामहिन्याभरापासून माध्यमिक शिक्षणविभागाकडून सर्व शाळांचेमुख्याध्यापक व केंद्रचालकांची सभाघेणे, पालक सभा घेणे यासारखेउपक्रम सरू होते. जिल्ह्यात इयत्ता १२वी परीक्षेसाठी जिल्ह्यात बत्तीस हजार २४८ परीक्षार्थी आहेत. त्यामध्ये ३० हजार ९८६ नवीन परीक्षार्थी व १ हजार २९८ पुनरपरिक्षार्थी समाविष्ट आहेत. जिल्ह्यात एकूण १०९ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे.

Related posts

Microsoft Wants to Make HoloLens the Future of Education

admin

शिवभक्त मित्र मंडल च्या वतीने छत्रपति श्री शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

nirbhid swarajya

जलंब पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा महापूर…

nirbhid swarajya
error: Content is protected !!