April 19, 2025
खामगाव चिखली नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर मेहकर शेगांव संग्रामपूर

तालुक्यातील शेतकरी सुखावला आता येणार पेरणीला वेग

शेगांव : तालुक्यातील परिसरात गेल्या काही दिवसांत पाऊस पडल्याने बळीराजा शेतीच्या कामात गुंतला असून चोहीकडे पेरणी ची लगबग सुरु झाली आहे . परिसरात यावर्षी कपाशी व तूर पिकाचा पेरा वाढला असून शेतकऱ्यांचा कल कपाशी तूर पिकाकडे वळला आहे . या आठवड्यात परिसरात दोन तिन वेळा पाऊस पडल्याने पेरण्या सुरू झाल्या आहेत . एकीकडे परत एकदा कोरोना सारखी भयावह परिस्थिती निर्माण झाली असतांना जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा या परिस्थितीत सुद्धा आपला जीव मुठीत धरून योगदान देत आहे . परिसरात आलेल्या वादळी वाऱ्याच्या सोसाट्याच्या वाऱ्याने व पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडवली होती .

Related posts

कॅशियरकडून नोटा बदलून आणतो असे म्हणून २३ हजार लंपास केले

nirbhid swarajya

पुढील आदेश येईपर्यंत अवैध धंदे बंद…..

nirbhid swarajya

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला

nirbhid swarajya
error: Content is protected !!