April 19, 2025
आरोग्य जिल्हा नागपुर बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ

या वयोगटातील सर्वांचे कोरोना लसीकरण करा; नाना पटोले

मुंबई : संपूर्ण देशात काल १ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षावरील व्यक्तिंना कोरोनाची लस देण्यात येत आहे. मात्र, २० ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याने राज्यात १८ वर्षांवरील तरुणांना सरसकट कोरोनाची लस देण्यात यावी त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहिमही राबिवली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केली ही चांगली बाब असली तरी सध्यस्थितीत तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्याने होत असल्याचे समोर आल्याने वयाची अट शिथिल करणे ही काळाची गरज आहे.

यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी परवानगी मिळवावी व राज्यभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घ्यावी, असं पटोले यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तेव्हापासून २० ते ४५ वयोगटातील तरुणांना याचा संसर्ग झाल्याचे पाहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे असेही ते म्हणाले.

Related posts

भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा कार्यकारणी गठीत

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 290 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 52 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

उसन वारीचे पैसे मागितल्यामुळे आरी व चाकुने मारहाण

nirbhid swarajya
error: Content is protected !!