November 20, 2025
जळगांव जामोद शेतकरी

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानिचे पंचनामे करुन शेतक-यांना भरीव मदत द्यावी- प्रशांत डीक्कर

जळगाव जा : संग्रामपुर तालुक्यातील हिगंणा,जस्तगाव,पातुर्डा,वानखेड,दुर्गादैत,मनार्डि, उकळगाव,वरवट,एकलारा,बावनबीर,काकणवाडा, सावळी,सह ईतर गावात २७ जुन रोजी सकाळी अतिवृष्टी झालेल्या शिवारात स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर व कृषी विभागाची टीम यांनी शेतात जाऊन पिक नुकसानिची पाहणी केली. शेतक-यांच्या शेतातील सोयाबिन,कपाशी,मका, ज्वारी,तुर,उडिद,मुंग असे सर्व पिके उध्दवस्त झाले आहेत. या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन शेतक-यांना भरीव नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी आज केली आहे. आर्थिक दृष्ट्या शेतकरी पुर्णपने खचेल असंताना ही निसर्गाची अवकृपा शेतक-यांना मारक ठरलेली आहे. एकतर चार वर्षाचा दुष्काळ व मागील वर्षीचा ओला दुष्काळाने शेतकरी हवालदिल झालेला आहे. या वर्षी पेरणी करुनही कंपन्यांचे सोयाबिनचे बोगस बियाणे निघाल्याने अनेक शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातच २७ जुन रोजी अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांच्या शेकडो एकर जमीनी खरडुन गेल्या व न भरुण निघनारी पिकांची हानी झाली. त्यामुळे पुन्हा अक्षरशा शेतक-यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागात बहुतांष शेतक-यांना तिबार पेरणी कराव्या लागतात. हे शेतक-यांन समोर मोठे संकटच आले आहे. अतिवृष्टी झालेल्या शेतक-यांच्या शिवारात पाहणी करतांना. खरडुन गेलेल्या जमिनीचा व पिकांची नुकसान भरपाई म्हणुन शेतक-यांना लवकरच शासनाकडुन भरीव मदत मिळवुन देऊ अशी ग्वाही पिक पाहणी करतांना स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेतक-यांना दिली आहे.

Related posts

अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा झाला भारतीय नौदल सैनिक! सर्व जाती धर्माच्या वतीने फुलांचा वर्षाव करून केला सन्मान वाजत गाजत काढली मिरवणूक

nirbhid swarajya

‘जाहीरनामा जनतेचा’ उपक्रमाचा आज शुभारंभ…

nirbhid swarajya

बुलडाणा ऐवजी बुलढाणा असे लिहावे लागेल

nirbhid swarajya
error: Content is protected !!